सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कपाशीवरील जीवणूजंण्य करपा 🌱🌾🐞

- कपाशीवरील जीवणूजंण्य करपा :- 
Xanthomonas citri subsp. malvacearum

- प्रादुर्भावाची लक्षणे :- असल्यास ओळख करण्यासाठी खालील लक्षणे असल्यास निरीक्षण करावे.

• पानावर, बोंडांवर आणि फांद्यांवर कोणेदार ते गोलाकार, लाल ते तपकिरी कडा असलेले मेणचट, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात.

• कालांतराने ते डाग तपकिरी होतात.

• फांद्यांवर आणि खोडावर काळे व्रण येतात.

•  त्यामुळे अकाली पानगळ होते.

• प्रादुर्भाव देठ, पाने, फुलाच्या देठाशी असणारी कोवळी पाने आणि बोंडांवर दिसतो.  पानांवर ठिपके दिसतात, देठे व पानांच्या शिरा करपतात, बोंडे सडतात. पर्णदलावर लहान, हिरवे, पाणी शोषणारे गोलाकार किंवा अनियमित ठिपके विकसित होऊन तांबूस रंगाचे होतात. अधिक तीव्रतेचा प्रादुर्भाव असल्यास पर्णदल आणि रोपांत विकृती निर्माण होते. काळे आणि वाढलेले डाग पर्णदलामध्ये पसरून रोप मरते. पानाच्या मागील भागावर गडद रंगाचे अर्धपारदर्शक डाग दिसून येतात. नंतरच्या टप्प्यात पानांवरील डाग कोनात्मक होऊन, तांबूस ते काळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे चट्टे दिसतात.   काही वाणांमध्ये जिवाणू पानांच्या शिरा आणि आजूबाजूच्या पेशीसमूहांमधे प्रवेश करून त्या नष्ट करतात. पीक पिवळे पडते, विकृती निर्माण होऊन पानगळ होते.  लहान देठांवर लांब आणि काळपट चट्टे पडतात.  लहान बोंडावर कोनात्मक ते अनियमित काळे दबलेल्या आकाराचे ठिपके दिसतात.  उष्ण व दमट हवामानात जिवाणू प्रादुर्भावामुळे बोंडे सडतात,  बोंडाची गळती होते, विकृती निर्माण  होते.


- हा रोग कशामुळे होतो त्याची सर्विस्तर माहिती दिली आहे :-
 

• झँथोमोनाज सिट्रिच्या उपप्रजाती मालवेसेरममुळे कपाशी वर जीवणूजंण्य करपा उद्भवतो. हे जीवाणू संक्रमित झाडांच्या अवशेषात आणि बियाणात जगतात. हा कपाशीवरील सर्वात जास्त नुकसान करणारा रोग आहे. जोरदार पाऊस आणि उच्च आर्द्रता याबरोबर ऊबदार तापमान, रोगाच्या वाढीस अनुकूल असते. जीवाणू पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा शेतात काम करताना झालेल्या जखमांतुन पानात शिरतात. जोरदार वादळी पाऊस किंवा गारपीट झाली असता रोग सर्वात जास्त गंभीर का असतो ते यावरुन कळते. संक्रमण बियाणांद्वारे असल्याने, दूषित बियाणांना आम्ल उपचार करुन जीवाणूंचा प्रसार कमी केला जाऊ शकतो. स्वयंभु झाडाचे रोप देखील जीवणूजंण्य करप्याच्या संक्रमणाचे प्राथमिक स्त्रोत असु शकतात.

• ढगाळ वातावरणात कपाशीवर जिवाणूजन्य पानांवरील चट्टे आणि ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. प्रामुख्याने हा रोग बीटी आणि संकरित जातींवर फुलोरा आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

• रोगकारक जिवाणू - झान्थोमोनास ऑक्सोनोपोडीस पीवी. मालव्यासियारम अनुकूल घटक  ३२ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान, सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के. लवकर केलेली पेरणी, उशिरा झालेली विरळणी आणि सिंचन.  जमिनीची सदोष मशागत, जमिनीत पालाशची कमतरता.  पावसाळी, ढगाळ हवामानानंतर लख्ख सूर्यप्रकाश.रोगाचे चक्र  रोगकारक जिवाणू बियाण्याच्या आत, बियाण्यावर, कपाशीच्या धाग्यांवर आणि न कुजलेल्या पिकांच्या काडीकचऱ्यावर सुप्तावस्थेत राहतात.  प्राथमिक स्रोत हा प्रादुर्भावीत बियाणे आणि त्यावरील धागे असतात. दुय्यम प्रसार हा वादळी पाऊस व दवबिंदूद्वारे होतो.


- हा रोग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी किंवा प्रतिबंधक उपाय :-

• उच्च प्रतीचे, रोगमुक्त किंवा आम्ल उपचार करुन रुई काढलेले बियाणे लावा.

• करपा प्रतिकारक वाण लावणेही रोग टाळण्याची प्रभावी पद्धत आहे.

• शेताचे निरीक्षण करून संक्रमित आणि आजुबाजुचीही काही झाडे काढुन टाका.

• झाडीत आर्द्रता कमी रहाण्यासाठी आणि पाने कोरडी
ठेवण्यासाठी शक्य होईल तितकी झाडी मोकळी ठेवा.

• झाडी ओली असताना, शेतात काम करणे टाळा किंवा लागवड करु नका.

• फवारा किंवा तुषार सिंचन करु नका. 

•अधिक नुकसान टाळण्यासाठी संक्रमित पिकाची काढणी शक्य तितक्या लवकर करा.

• रोपे शक्य तितक्या लवकर काढुन जाळा.

• संक्रमित झाडांचे अवशेष विघटित होण्यासाठी खोल पुरा.

• संवेदनशील नसणाऱ्या पिकाबरोबर फेरपालट करा.

- जैविक नियंत्रण :-

सुडोमोनस फ्ल्युरोसेनस आणि बॅसिलस सबटिलिस जुंत असणाऱ्या टाल्क आधारीत पावडरीच्या द्रावणांचा वापर एक्स. माल्व्हॅसिरमविरुद्ध चांगले परिणाम देतो. आझादी्रॅक्टिन इन्डिका (नीम अर्क) चा अर्क वापरा. वाढ नियंत्रक उत्पाद जे अनियंत्रित वाढ थांबवतात ते वापरुन सुद्धा जिवाणूजन्य करण्याचे संक्रमण टाळले जाऊ शकते.


- रासायनिक नियंत्रण :- 

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अधिकृत प्रतिजैवकांसोबत कॉपर ऑक्झिक्लोराइडचे बीजोपचार केल्याने देखील कपाशीवर जिवाणूजन्य करपा देणाऱ्या जंतुंविरुद्ध चांगला प्रभाव मिळतो.

(प्रतिलिटर पाणी)  कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम आधिक स्ट्रेप्टोमायसीन* १०० मिलीग्रॅम  रोगाचे प्रमाण पुन्हा आढळल्यास पहिल्या फवारणीनंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...